महात्मा बसवेश्वराांची शिकवण
Abstract
भारत ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक लहान मोठे संत होवून गेले. शंकराचार्य, रामानुजाचार्य, रामानंद, कबीर, तुलसीदास, नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतानी भक्तीच्या मार्गाने ईश्वरप्राप्तीवर भर दिल्याची दिसते. भारतीय संस्कृती व धर्म यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे कार्य संतानी केले. त्यातीलच एक संत म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या आणि धार्मिक जागृतीच्या संदर्भात महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणुकीला एक विशेष अर्थपूर्णता प्राप्त होते. आज शिक्षण, व विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीने समाजातील रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीप्रथा, भेदभाव, इत्यादींना थारा मिळत नसल्याचे दिसत आहे. आजच्या काळाला सुसंगत वाटावी अशी शिकवण महात्मा बसवेश्वरांनी सुमारे ८०० वर्षापूर्वी १२ व्या शतकातच दिल्याची दिसते. त्यामुळे ते किती दूरदृष्टीचे संत होते हे लक्ष्यात येते.