महात्मा बसवेश्वरांचे समाजवादी आणि मानवतावादी विचार

लेखक

  • Prof. Shinde Kondiba Sidram ##default.groups.name.author##
  • Prof. Dr. Pawar Sajjan Uddhav ##default.groups.name.author##

सार

महात्मा बसवेश्वर हे समता बंधुता आणि श्रमाला प्रतिष्ठा देणारे थोर समाजसुधारक होते. त्यांनी जातीयता लिंग भेद आणि अंधश्रद्धेवर कडाडून टीका करत अनुभव मंटपद्वारे लोकशाही मूल्यांची पायाभरणी केली. कायकवे कैलास  हा त्यांचा विचार आजही सामाजिक-आर्थिक समतेचा मुख्य आधार आहे. महात्मा बसवेश्वरांनी जाती-पातीचे उच्चाटन करून लिंगायत धर्माच्या माध्यमातून सर्वांना समानतेची वागणूक दिली जे १२ व्या शतकातील समाज सुधारणा आहे. महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठा नसून प्रामाणिक कष्ट हाच खरा परमेश्वर आहे असे त्यांनी सांगितले. स्त्री-पुरुष गरीब-श्रीमंत आणि सर्व जातीच्या लोकांना एकत्र येऊन आध्यात्मिक व सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी अनुभव मंटप स्थापन केला जे जगातील पहिले संसद मानले जाते.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

प्रकाशित

2026-03-19