बसवेश्वर व रामदरश मिश्र यांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास

##article.authors##

  • श्री. सुमित सुनीलदत्त गवरे ##default.groups.name.author##
  • डॉ. संदीप भाऊ चपटे ##default.groups.name.author##

##article.abstract##

बसवेश्वर हे बाराव्या शतकातील महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि भक्तिकालीन संत होते. त्यांनी समता, श्रमप्रतिष्ठा, जातिव्यवस्थेचा विरोध आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. त्यांच्या ‘वचन’ साहित्याद्वारे त्यांनी कर्मप्रधान भक्ति, सामाजिक न्याय आणि मानवी मूल्ये यांचा पुरस्कार करत तत्कालीन समाजव्यवस्थेला मूलभूत आव्हान दिले. “कायाकवे कैलास” ही त्यांची संकल्पना आजच्या श्रमसंस्कृती व नैतिकतेच्या चर्चेतही अत्यंत महत्त्वाची ठरते.

          रामदरश मिश्र हे समकालीन हिंदी साहित्यातील महत्त्वाचे कवी, कथाकार आणि चिंतक आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये ग्रामीण जीवन, मानवी संवेदना, सामाजिक विषमता, आधुनिकतेचे दुष्परिणाम आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेचे वास्तवदर्शी चित्रण आढळते. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या वेदना, संघर्ष आणि आशा-आकांक्षा यांना अभिव्यक्ती दिली आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submissions.published##

2026-03-19