जात सुधारणा आणि सामाजिक न्याय : इतिहास व वास्तव
Keywords:
जात सुधारणा आणि सामाजिक न्यायAbstract
भारतीय समाजाची रचना प्राचीन काळापासून जातव्यवस्थेवर आधारलेली होती. ही व्यवस्था सुरुवातीला कर्म, गुण, व्यवसाय व सामाजिक जबाबदाऱ्यांशी यांवर आधारित असलेली वर्णव्यवस्था कालांतराने ती जन्माधारित, विषमता निर्माण करणारी, शोषणात्मक व स्थिर जातव्यवस्थेत बनली. जातव्यवस्थेमुळे सामाजिक असमानता, अस्पृश्यता, शिक्षणावर निर्बंध, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि सामाजिक अन्याय निर्माण झाला. प्राचीन काळात धर्मग्रंथ व स्मृतीग्रंथांनी जातव्यवस्थेला धार्मिक अधिष्ठान दिले. मध्ययुगात ग्रामकेंद्रित अर्थव्यवस्था, बलुतेदारी व जजमानी पद्धतींमुळे जातीय बंधने अधिक कठोर झाली. आधुनिक काळात ब्रिटिश राजवटीत जातव्यवस्थेचे प्रशासकीय वर्गीकरण झाले, तरी याच काळात पाश्चात्त्य शिक्षण, विवेकवाद व लोकशाही मूल्यांमुळे जातव्यवस्थेची चिकित्सक तपासणी सुरू झाली.
Downloads
References
जातिव्यवस्था आणि भारतीय समाज , शंकर गोविंद केतकर, कॉण्टिनेंटल प्रकाशन, पुणे – 1909, पृ. 73 गुलामगिरी, महात्मा जोतिराव फुले, प्रथम प्रकाशन पुणे, 1873, - पृ. 120 वैदिक संस्कृतीचा विकास, तर्कतीर्थ लाक्ष्मनाशाश्त्री जोशी, प्रज्ञापाठशाळा मंडळ,वाई. 1972, पृ. 311 जातिव्यवस्थेचा उच्छेद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वप्रकाशित लाहोर- 1936, पृ.195 भारतातील विविध सामाजिक चळवळी यांचा सामाजिक शास्त्रीय अभ्यास, ग. प. जोशी, रावत प्रकाशन, पुणे. 2022, पृ.254