महाराष्ट्र विधानसभा राखीव मतदार संघातील राजकीय नेतृत्वाचा अभ्यास
##semicolon##
महाराष्ट्र विधानसभा##article.abstract##
आज जगातील 90 टक्के देशानी लोकशाही व्यवस्था स्विकारलेली आहे. राष्ट्र स्वतःला लोकशाही राष्ट्र म्हणून घेत आहेत. लोकशाही मूल्यांनमध्ये समता, स्वतंत्र्य व बंधुता हे मुल्य लोकशाहीमध्ये जपले जातात.आरक्षणाचा उद्देश समता प्रस्थापित करणे हा असतोहे सर्वमान्य झाले आहे. भारतामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी शाहु फुले,आंबेडकरांचे योगदान महत्वाचे आहे. भारतीय लोकशाहीच्या वैशिष्ठांपैकी आरक्षण महत्वाचे मानले जाते. भारतीय घटनाकारांनी आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेपणाचा विचार करून देशातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राखीव जागेचे धोरण स्वीकारले. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सर्वात मोठा प्रश्नविकासाचा होता. भारतासारख्या राष्ट्रात जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था बहुभाषिकता आणि विषम अशी प्रादेशिकता मोठ्या प्रमाणात होती.