वंचितांचा इतिहास आणि सामाजिक परिवर्तन
Keywords:
वंचितांचा इतिहास सामाजिक परिवर्तनAbstract
अलीकडच्या काळात इतिहास विषयक एक नवीन दृष्टिकोन उदयसेवू लागला भारतात इतिहास लेखन विविध स्तरावर झाले. राष्ट्रवादी विचार प्रवाहने झालेल्या इतिहास लेखनात भारताचे अंतरंग दिसत नाहीत. भारतीय समाजातील विविध जाती वर्ग जातीविरोधी आंदोलने सामाजिक धार्मिक चळवळी ब्राह्मण इतरांची चळवळ याकडे इतिहासकाराने विशेष लक्ष दिले नाही. बहुतेक लेखन पुरुषप्रधानतेतून झाले . इतिहास लेखनात महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर नामशूद्र चळवळ मातुआ पंथ स्वाभिमानी चळवळ हे विचार आलेच नाही. स्वातंत्र्योत्तर काळात सण १९५०ते ६०या काळात भारतीय विचार परंपरेवर डाव्यांचा प्रभाव पडला. मार्क्सवादी विचाराने इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे प्रयत्न झाले. त्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, रजनी पाम दत्त,ए.आर. देसाई, डी.डी.औ कोसंबी यांचा समावेश होईल. राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा या वादात राजकीय विषयाला महत्त्व देण्यात आले. गेल ऑमव्हेट यांनी जात प्रमुख म्हणून लिखाण केले. स्त्रीवादी लिखाणाला याच काळात मान्यता मिळाली. या विविध प्रवाह मधून १९८२ पासून वंचितांच्या अभ्यासात सुरुवात झाली.