गाथासप्तशती’’ मधील स्त्री जीवन
##semicolon##
गाथासप्तशती स्त्री जीवन##article.abstract##
प्राकृत साहित्यात प्राचीन काळापासून म्हणजेच आगम ग्रंथ रचनेपासून मुक्त काव्य लिहिले जात असलेले दिसून येते कारण आगम साहित्यात अनेक ठिकाणी उपदेश, नैतिकता इत्यादींचे वर्णन करण्यासाठी रसयुक्त पद्यांचा उपयोग केला जात असलेला दिसून येतो. त्यातूनच मुक्त काव्य रचना करण्याची पद्धत अस्तित्वात आलेली असावी.इ.स. दुस-या, तिस-या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन वंशीय राजा 'हाल' यांनी "गाथासप्तशती" नावाचे प्रथम मुक्त काव्याचे संपादन केले. त्यानंतर जयवल्लभानी ' वज्जालग्गं' नावाचे मुक्त काव्य लिहिले. मुक्त काव्य म्हणजे संस्कारांचा, संस्कृतीचा एक मौल्यवान ठेवाच होय. यामध्ये सुवचनांचा, उपदेशांचा, मार्गदर्शनाचा, संत-सत्पुरुषाच्या आचार विचारांचा, संग्रह असतो. त्यामुळेच कोणत्याही साहित्यात मुक्त काव्याचे महत्त्व अधिक असलेले दिसून येते.